महिला, बालविकास, आरोग्य व आहारशिक्षण.

झिरो पोलीओ डोस बाळाला जन्मानंतर लगेच देतात.

कमी वजनाचे बालक म्हणजे जन्मतः 2500 ग्रॅम पेक्षा कमी वजन असणारे बालक.

जन्मलेल्या बाळाचे वजन जन्मल्याबरोबरच घ्यावे.

बाळाला स्तनपान जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत दयावे.

गरोदरपणात मातांना लोहयुक्त 100 गोळ्या दिल्या जातात.

एका वर्षाच्या आतील मुलांना जीवनसत्वाचा 1,00,000 युनिट डोस दिला जातो.

गरोदरपणात जोखमीग्रस्त माता ओळखण्यासाठी हिमोग्लोबीन तपासावे.

ऊर्जेची गरज प्रामुख्याने कर्बोदकांपासून भागते.

डाळी व कडधान्यापासून प्रथिने मिळतात.

शरीराची वाढ व प्रतिकारशक्ती प्रथिनांवर अवलंबून असते.

मेंदूच्या रचनेत स्निग्ध पदार्थांचा महत्त्वाचा वाटा असतो.

शरीराला खनिजे व क्षार अल्प प्रमाणात आवश्यक असते.

रक्त व रक्तपेशी यासाठी लोह आवश्यक असते.

थकवा येणे, चक्कर येणे ही ॲनिमिया / रक्ताक्षयाची लक्षणे आहेत.

मज्जासंस्थेसाठी कॅल्शियम आवश्यक असते.

टिटेंनी हा रोग (लहान मुलांमध्ये) दिसतो.

चीज, पनीर, दही, नाचणीपासून कॅल्शियम मिळते.

बालकातील लांबलेला गॉएटर रोग म्हणजे क्रेटीनिझम्.

डोळ्यांसाठी “अ” जीवनसत्व आवश्यक असते.

आंबट तुरट फळांमध्ये “क” जीवनसत्व जास्त असते.

शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तिसाठी “क” जीवनसत्व आवश्यक असते.

प्रजनन क्षमतेसाठी “इ” जीवनसत्व आवश्यक असते.

प्रौढ व्यक्तीसाठी दररोज किमान 2 ते 2.5 लीटर पिण्याचे पाणी आवश्यक असते.

धान्य पॉलीश केल्यामुळे त्यातील “ब-१२” जीवनसत्व नष्ट होते.

दूधापासून कॅल्शियम, जीवनसत्व अ, ब, ड मिळते.

दूधाला पुर्णान्न असे म्हणतात.

माशांपासून (Fish) मिळणारे तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.

ICDS (एकात्मीक बाल विकास प्रकल्प) महात्मा गांधीच्या 106 व्या जयंती दिनी सुरु केला गेला.

ग्रामीण अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या निकष 400 ते 800 इतका आहे.

ग्रामीण मिनी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या निकष 150 ते 400 इतका आहे.

शहरी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या निकष 400 ते 800 एवढा आहे.

आदिवासी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या निकष 300 ते 800 एवढा आहे.

आदिवासी मिनी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या निकष 150 ते 300.

बालकांना पूरक पोषण आहार महिन्यातून किमान 25 दिवस दिला जातो.

पूरक पोषण आहार वर्षातून किमान 300 दिवस दिला जातो.

नवसंजीवनी योजना दुर्गम आदिवासी भागासाठी आहे.

नवसंजीवनी योजनेत 3-6 महिने ते 3 वर्ष या बालकांसाठी रोजचा आहार 600 उष्मांक एवढा आवश्यक असतो.

नवसंजीवनी योजनेत 6 महिने ते 6 वर्षे अती तीव्र कमी वजन बालके यांचा आहार 950 उष्मांक एवढा असतो.

नवसंजीवनी योजनेत गरोदर स्त्रियांसाठी रोजचा आहार 700 उष्मांक आवश्यक असतो.

सबला योजना 11 ते 18 वर्षे या वयोगटासाठी आहे.

डी.पी.टी. बुस्टर डोस 18 महिने वयोगटासाठी असतो.

मुलाच्या वाढीचे श्रेणीकरण तीन प्रकारे करतात.

0 ते 6 वयोगटातील सर्व बालकांची नियमित त्रैमासिक तपासणी करतात.

मुले व महिला यांच्याशी संबंधीत सर्व सेवा एकाच वेळी देणारे केंद्र म्हणजेच अंगणवाडी केंद्र होय.

एका अंगणवाडीत किमान 40 मुलांची सोय असावी.

अंगणवाडीत राष्ट्रीय झेंडा व वजनकाटा ठेवावा.

अंगणवाडी केंद्र 4.5 तास उघडे ठेवावे.

अंगणवाडी केंद्रात पूर्व शालेय शिक्षणासाठी रोज 2 तास वेळ दयावा.

किशोरी शक्ती योजना इ.स. 2000 पासून सुरु झाली.

किशोरी योजना 1992 पासून सुरु झाली.

किशोरी शक्ती योजना 11 ते 18 वर्ष वयोगटासाठी आहे.

अंगणवाडी स्तरावर किशोरीसाठी दिले जाणारे कार्ड म्हणजे किशोरी कार्ड होय.

पाळणाघर योजनेचा वयोगट 6 महिने ते 3 वर्ष हा आहे.

प्रति पाळणाघर प्रति वर्षासाठी 1 लाख रुपये अनुदान असते.

आधारगृह योजना संकटग्रस्त महिलांसाठी आहे.

देवदार्सीच्या मुलींच्या विवाहासाठी मिळणारे अर्थसहाय्य 10 हजार रुपये आहे.

40 वर्षावरील देवदासींसाठी दर महा निर्वाह अनुदान 500 रुपये दिले जाते.

कामधेनू योजना गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आहे.

महिला व बालकल्याण समिती -1992.

स्वाधार योजना केंद्रशासन नैतिक संकटग्रस्त महिलांसाठी राबवते.

अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांसाठी केंद्रशासन उज्ज्वला योजना राबविते.

महाराष्ट्रात देवदासी प्रथा नाहीशी करणे – 2005.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा – 2005. (लागू 2006).

हुंडा प्रतिबंधक कायदा- 1961.

बालसंगोपन योजना राज्यशासनाने 1975 ला सुरु केली.

राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2006 ला केली.

स्विकार केंद्रे भिक्षेकऱ्यांसाठी असतात.

बालमृत्यूला प्रमुख कारण कुपोषण (55%)आहे.

ग्रामबाल विकास केंद्राचा कालावधी 30 दिवसांचा असतो.

ग्रामबाल विकास केंद्रासाठी प्रामुख्याने निवडली जाणारी जागा ही

अंगणवाडी केंद्र असते.

ग्रामबाल विकास केंद्राची प्रमुख अंगणवाडी कार्यकर्ती असते.

ग्रामबाल विकास केंद्राच्या जनजागृतीसाठी घेतलेली सभा म्हणजेच ग्रामसभा /महिला ग्रामसभा.

ग्रामबाल विकासाचा कालावधी स. 8 ते 12 व दु. 4 ते 6 असतो.

ग्रामबाल विकास केंद्रातील संहिता चार आहेत. या संहिता आरोग्य संहिता, आहार संहिता, संनियंत्रण संहिता व प्रशिक्षण संहिता

ग्रामबाल विकास केंद्र 6 वर्षाखालील SAMMAM बालकांसाठी असते.

गंभीर ते तीव्र कुपोषित बालक म्हणजे SAM होय.

मध्यम कुपोषित बालक म्हणजे MAM होय.

10 पेक्षा कमी बालकांसाठी ग्रामबाल विकास केंद्र सुरु करता येते.

अलबेंडाझोल हे जंतुनाशक आहे.

अलबेंडाझोल 1 ते 2 वर्ष वयोगटासाठी देण्याची मात्रा 5 ML.

अलबेंडाझोल हे औषध 2 ते 6 वर्ष वयोगटासाठी देण्याची मात्रा

10 ML असते.

अंडी न खाणाऱ्या बालकासाठी ग्रामबाल केंद्रातील आहार हा केळी व बटाटे असतो.

ग्रामबाल विकास केंद्रात मुलाला रोजचा 940 उष्मांक आहार दिला जातो.

बालकांनी एका दिवसात किमान 6 ते 7 वेळा आहार घ्यावा.

वयाच्या 3 वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ 90% पूर्ण होते.

गरोदर स्त्रियांचे वजन 10 ते 12 किलो वाढणे अपेक्षित आहे.

ग्रामबाल विकास केंद्राचा मुख्य उद्देश कुपोषणमुक्ती हा आहे.

देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय कार्यक्रम ICDS.

ICDS कार्यक्रम महिला आणि बालविकास विभाग मंत्रालयाद्वारे चालतो.

अंगणवाडी मुख्य सेविका बीट स्तरावर कार्य करते.

अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्यसेविकेकडे 25 अंगणवाड्यांचे पर्यवेक्षण असते.

ASHA (आशा) कार्यकर्ती आरोग्यविषयक कार्य करते.

शासनाकडून अंगणवाडी केंद्राला दर वर्षी एक औषध किट मिळते.

बालक म्हणजे 14 वर्षाहून कमी वयाची व्यक्ती.

जन्मपूर्व अवस्था म्हणजे गर्भधारणेपासून जन्मापर्यंतची अवस्था होय.

शिशू अवस्था म्हणजे जन्मापासून 2 वर्षापर्यंतची अवस्था होय.

बाल्यावस्था म्हणजे 2 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतची अवस्था.

किशोरावस्था म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतची अवस्था.

शरिराचा आकार, रचना, प्रमाण यात परिवर्तन म्हणजे शारिरीक विकास होय.

स्नायूंच्या कार्याचे नियंत्रण व शरिराच्या विविध भागात ताळमेळ म्हणजे गतीसंबंधी विकास.

समाजाच्या अपेक्षेनुसार व्यवहार करण्याची योग्यता म्हणजे सामाजिक विकास.

जाणीव होणे, भावना नियंत्रण व अभिव्यक्ती करण्याची योग्यता म्हणजे भावनात्मक विकास होय.

मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व शालेय शिक्षण महत्वाचे आहे. स्पर्श, वास, ऐकणे, चव व पाहणे म्हणजे मूळ संज्ञात्मक कौशल्य होय.

संबोधन म्हणजे एकाच वर्गातील वस्तू, लोक, ठिकाणे यांचे मानसिक चित्रे किंवा संकल्पना होय.

प्राणी, पक्षी, भाज्या, वनस्पती नैसर्गिक पर्यावरण होय.

पाणी, हवा, आकाश, जमिनी म्हणजे भौतिक पर्यावरण होय.

कुटुंब, समाज, सण म्हणजे सामाजिक पर्यावरण होय. ऐकणे, शब्दसंग्रह विकास, बोलणे, शिकणे, लिहीणे म्हणजे भाषाविकास होय.

अंगणवाडीत पी. टी./ बाहेरील खेळांसाठी दररोज 20 मिनिटे वेळ दयावा.

अंगणवाडीची 2 महिन्यातून एकदा नैसर्गिक सहल काढावी.

वजन, उंची, कंगवा, टॉवेल इ. चा कॉर्नर म्हणजे माझा कॉर्नर.

शारिरीक, मानसिक व सामाजिक रुपाने परिपूर्ण असणे म्हणजे आरोग्य होय.

आपल्या शरिराला सहा पोषक तत्वाची आवश्यकता असते. ही सहा तत्वे- कार्बोहायड्रेट, स्निग्ध, खनिजे, प्रोटीन, व्हिटॅमीन व पाणी अशी आहेत.

आहार घरी नेऊन खाण्यासाठी देणे म्हणजे THR.

मुलाच्या वाढीची देखरेख जन्मापासून सुरु करावी.

निरोगी मुलाचे वजन वरच्या पहिल्या वक्र रेषेच्या वर येते (वरती जाणारी वक्र रेषा मुलाचे वजन वाढते हे दाखविते).

सरळ जाणाऱ्या वाढीच्या वक्र रेषेने मुलाच्या वजनात वाढ होते.

वाढीची रेषा खाली येत असेल तर मुल धोक्यात आहे हे समजते.

मध्यम कुपोषित मुलाचे वजन पहिल्या व दुसऱ्या रेषेच्या मधील पट्ट्यात येते.

गंभीर कुपोषित मुलाचे वजन दुसऱ्या रेषेच्या लाल पट्यात येते.

पोलिओमाईलायटीस म्हणजे पोलिओ. ओरल पोलिओ डोस डि. पी.टी. लसी बरोबर दिले जातात.

घश्यात व मानेवर सूज हे लक्षण (बाळाबाबत) डिफ्थेरियाची आहेत.

हलका ताप, सर्दी, खोकला, उलटी ही डांग्या खोकल्याची लक्षणे आहेत.

टिटॅनस या आजारात मुल पूर्णपणे तोंड उघडू शकत नाही व स्नायू आखडतात.

ताप, खोकला व शरीरभर पुरळ ही लक्षणे गोवर ची आहेत.

गंभीर रुग्णांसाठी अंगणवाडी कार्यकर्तीने संदर्भ सेवा दयावी.

MSM म्हणजे आरोग्य परिचारीका, दाई.

नवजात शिशूला 24 ते 48 तासांच्या आत मृत्यूचा धोका अधिक असतो.

शिशू पहिले 30 ते 60 मिनिटे अधिक शक्तीवान असते.

बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांपर्यंत मातेला येणारे दूध म्हणजे कोलस्ट्रॅम.

बाळाच्या जन्मानंतर एका तासांच्या आत आईचे दूध पाजावे.

अल्प पोषण म्हणजे वयानुसार कमी वजन होय.

वयानुसार कमी उंची म्हणजे अवृध्दपोषण.

उंचीनुसार कमी वजन म्हणजे क्षीण पोषण.

मरास्मस/सुका रोग म्हणजे कॅलरी उष्मांकाच्या कमतरतेमुळे होतो.

गलगंड प्रतिबंधासाठी आहारात आयोडीनयुक्त मीठाचाच वापर करावा.

सूक्ष्मपोषक तत्वांअभावी कुपोषण होऊ शकते.

मतीमंदत्व म्हणजे बुध्दांक / आयक्यू 10 ते 15 पॉइंट पर्यंत कमी होणे.

दोन महिन्याहून कमी वयाचे शिशू एका मिनिटात 60 किंवा अधिक वेळा श्वास घेतात.

दोन महिने ते बारा महिने वयाचे शिशू एका मिनिटात 50 किंवा अधिक वेळा श्वास घेतात.

12 महिने ते 5 वर्षाचे मूल एका मिनिटात 40 किंवा अधिक वेळा श्वास घेतात.

मुल दर दिवशी 3 किंवा जास्त वेळा पातळ शौच करते यास जुलाब म्हणतात.

जुलाबाच्या आजारात पाण्याची कमतरता जीवन रक्षक द्रावण म्हणजे ORS द्वारे भरुन काढता येते.

डोळ्याच्या संसार्गावरील ड्रॉप सल्फा सिटामाई सोडियम आहे.

पोटातील जंतासाठीचे औषध म्हणजे मेबेंडाझोल.

कानदुखीवरील प्रथोमोपचार सल्फासिटामाईड सोडियम ड्रॉप.

ओबिडीन आयोडीन मलम ओल्या जखमेसाठी असते.

जेंसन वायलेट हे औषध कोरड्या जखमेसाठी असते.

अंगणवाडी कार्यकर्ती ही एक उपचार या दृष्टीकोनातून मुलांना उपचार करते.

पॅरासिटामोल हे औषध तापासाठी असते.

कोट्राइमोक्साझोल हे औषध खोकला / श्वासरोगासाठी असते.

ICDS मार्गदर्शक सिध्दांत इ.स. 2000 वर्षी प्रसिध्द केला गेला.

लोकांच्या विशाल समूहापर्यंत आदेश पोहचविणे म्हणजे जनसंपर्क माध्यम होय.

लोकांच्या लहान लहान समुहापर्यंत संदेश पोहचविणे म्हणजे सामूहिक संपर्क माध्यम होय.

कोणत्याही एका व्यक्तिपर्यंत समोरासमोर संदेश पोहचविणे म्हणजे व्यक्तिगत संपर्क माध्यम होय.

ICDS अंतर्गत सेवा देण्यासाठी दिलेले 10 महत्वाचे संदेश म्हणजे जीवनाचा मंत्र होय.

बाळासाठी सर्वोत्तम अन्न व पेय आईचे दूध आहे.

प्रसूतीच्या वेळी सुरक्षेसाठी स्वच्छतेची पाच सुत्रे आचरणात आणावी.

मायक्रो बॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होणारा आजार क्षय रोग.

एड्स चा विषाणू – HIV.

स्वाईन फ्लू चा विषाणू – H1, N1.

बर्डफ्ल्यू – H5 , N1.

लेफ्टोसस्पायरा जीवाणूमुळे होणारा रोग लेफ्टोस्पायरोसिस होय.

हिमोफीलस प. जीवाणूमुळे होणारा डांग्या खोकला होतो.

डिफ्लोकॉक्स निमोनी जीवाणूमुळे होणारा रोग न्यूमोनिया.

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग मधुमेह.

एन्टेरोव्हायरसमुळे पोलिओ होतो.

हिपॅटॅटीस व्हायरस मुळे कावीळ होतो.

रेबीजचा व्हायरस रॅब्डो.

प्लॅझमोडियम व्हायव्हॅक्समुळे मलेरिया होतो.

अस्कॅरिअसिस म्हणजे जंत होणे.

क्लोस्ट्रीडियम टिटॅसनी जीवाणूमुळे धर्नुवात होतो.

मायक्रोस्पॉरम टिरकोफायटॉन बुरशीमुळे गजकर्ण होतो.

पेशींची अमर्याद वाढ म्हणजे कर्करोग होय.

क्षय जंतूचा शोध रॉबर्ट कॉक ने लावला.

कॉलरा जंतूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला.

देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी लावला.

रेबीज लसीचा शोध लुई पाश्चर यांनी लावला.

सुक्ष्मदर्शकचा शोध अँटन ल्युवेन हॉक यांनी लावला.

इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बैंटीक यांनी लावला.

पेनिसिलीन प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला.

लसीकरणाचा जनक एडवर्ड जेन्नर यांना म्हणतात.

खाजेवरील औषध बॅबेन्झाईल बेन्झोएट.

पाश्चरीकरणाचा जनक लुई पाश्चर यांना म्हणतात.

ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावला.

अंधासाठीच्या लिपीचा शोध लुईस ब्रेल यांनी लावला.

रक्तगटांचा शोध कार्ल लँड स्टेनर.

थर्मामीटर / तापमापीचा शोध गॅलिलिओने लावला.

जीवनसत्वांचा शोध फुंक यांनी लावला.

रक्ताच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणजेच हिमॅटॉलॉजी.

हृदयाच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणजेच कार्डीओलॉजी.

चेतासंस्थेचा व मेंदूचा अभ्यास म्हणजेच न्यूरॉलॉजी.

डोळ्याचा अभ्यास म्हणजे ओप्थॅलमोलाॅजी.

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्ली येथे आहे.

सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ उत्तरप्रदेशला आहे.

नियासिन (ब-3) या जीवनसत्वाच्या आभावामुळे पेलाग्रा आजार होतो.

भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे नाव इंदिरा आहे.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय भोसरी (पुणे) येथे आहे.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्यालय पुणे येथे आहे.

राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

डॅप्सोन व MDT ही औषधे कुष्ठरोगासाठी वापरतात.

यर्नीसिया पेस्टीस जीवाणुमुळे प्लेग होतो.

ELISA-Enzyme Linked Immuno Sorbet Assay – एड्स ओळखण्याची टेस्ट.

वॅरीओला विषाणुमुळे देवी होत असे.

भारतातून देवी व नारु या रोगांचे निर्मुलन झाले आहे.

मीक्झो व्हायरसमुळे गोवर होतो.

पुरुषांच्या हृदयाचे वजन 340 ग्रॅम असते.

स्त्रियांच्या हृदयाचे वजन 255 ग्रॅम असते.

मानवी हृदयाच्या दोन ठोक्यामधील अंतर 0.8 सेकंद असते.

हृदयात जन्मतः दोष असणारे बालक ब्ल्यू बेबी.

पाठीच्या मणक्यांची एकूण संख्या 33 आहे.

प्रत्येक हातात 30 हाडे असतात.

प्रत्येक पायात 30 हाडे असतात.

शरीराच्या 39% वजन स्नायूंचे असते.

संपूर्ण आयुष्यात माणसाला 52 दात येतात.

दुधाचे दात 20 असतात.

लहान मुलांना शिकविण्याचे शास्त्र पेडॉगॉजी होय.

क्लोरोफॉमचा ‘शोध सिम्पन व हॅरिसन यांनी लावला.

चिकण गुणिया विषाणूमुळे होतो.

लिंग निदानासाठी चाचण्या कोरिएन बायोप्सी, अल्ट्रा सोनोग्राफी व सोनोग्राफी या आहेत.

उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्वीन.

जगातून देवी या रोगांचे निर्मूलन झाले आहे.

देशात महिला धोरण जाहीर करणारे प्रथम राज्य महाराष्ट्र -1994.

शैशवस्था वयातील बालक अनुकरण प्रिय असतात.

6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण – 86 वी घटनादुरुस्ती 2002.

घटसर्पाचा जीवाणू कॅनिबॅक्टोरीअम.

नायटा हा कवकजन्य बुरशीजन्य आजार आहे.

टायफॉइडचे जंतू दंडाकृती आकाराचे असतात.

पोलिओ विषाणू गोलाकृती आकाराचे असतात.

न्यूमोनिया आजाराचा रोगजंतू अंडाकृती आकाराचा असतो.

बालवाडी पोषण योजना 1971 साली सुरु झाली.

मानवी शरिरासाठी 24 क्षार आवश्यक असतात.

शार्क लिव्हर ऑईल मध्ये ‘अ’ जीवनसत्व असते.

कॉड लिव्हर ऑईलमध्ये ‘‘ जीवनसत्व असते.

सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण सुमारे 40% असते.

मानवास दररोज 100 ग्रॅम हिरव्या भाज्या आवश्यक असतात.

मानवास दररोज 200 मिली दूध आवश्यक असते.

DOTS उपचार पध्दती क्षयरोगासाठी आहे.

राष्ट्रीय क्षयरोग संस्था बंगळुरु येथे आहे.

महाराष्ट्रातील व भारतातीलही 1 ल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या आहेत.

केमोथेरपी हा उपचार कॅन्सर / कर्करोग यासाठी वापरतात.

आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना 1959 साली झाली.

युनिसेफची स्थापना 1946 साली झाली.

आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1970.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम 1952 पासून सुरु केला गेला.

राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम 1978 ला सुरु झाला.

सार्वजनिक लस टोचणी कार्यक्रम 1985 ला सुरु झाला.

बालजिवित्व व सुरक्षित मातृत्व कार्यक्रम 1992 पासून सुरु झाला.

प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम 1997 ला सुरु झाला.

राष्ट्रीय हिवताप निर्मुलन कार्यक्रम 1953 ला सुरु झाला.

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम 1955 ला सुरु झाला.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 ला सुरु झाला.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम 1955 चा आहे.

हगवण नियंत्रण कार्यक्रम 1980 या वर्षीचा आहे.

लैंगिक रोग नियंत्रण कार्यक्रम 1955 ला सुरु झाला.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम 1976 ला सुरु झाला.

राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम 1962 ला सुरु झाला.

किमान गरजांसाठी कार्यक्रम 1974-75 या वर्षीचा आहे.

राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम 1985-90 या वर्षीचा आहे.

धुमपानविरोधी दिन (कर्करोग जनजागृती) 1 जानेवारी हा आहे.

कुष्ठरोग निवारण दिन 30 जानेवारी आहे.

मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी आहे.

महिला आरोग्य दिन 26 फेब्रुवारी आहे.

जागतिक महिला दिन 8 मार्च आहे.

जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च आहे.

अंधत्व प्रतिबंध सप्ताह 1 ते 7 एप्रिल आहे.

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल आहे.

जागतिक परिचारिका दिन 12 मे आहे.

तंबाखूविरोधी दिन 31 मे आहे.

हिवताप प्रतिरोध महिना, जनजागरण अभियान 1 ते 30 जून असे आहे.

पर्यावरण दिन 5 जून आहे.

दृष्टिदान सप्ताह 10 ते 16 जून असा आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून.

सुरक्षित मातृत्व दिन 10 जुलै.

जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिन 11 जुलै.

स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट.

जागतिक युवा दिन 12 ऑगस्ट.

पोषण आहार सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट.

आंतरराष्ट्रीय बालिका दिन 24 सप्टेंबर.

रक्तदान दिन, जेष्ठनागरिक दिन 1 ऑक्टोबर.

स्वच्छता दिन 2 ऑक्टोबर.

मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर.

जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर.

बालदिन 14 नोव्हेंबर.

जागतिक एड्स प्रतिबंध दिन 1 डिसेंबर.

जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर.

जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर.

होमिओपॅथीचा जनक हायेनमान.

एक्झिमा आजार त्वचेला होतो.

नेफ्रायटिस हा आजार मुत्रपिंडाशी संबंधित आहे.

सायनोसायटिस हा आजार नाकाला होतो.

मार्फिन(अफू)हे वेदनाशामक आहे.

हेट्रॅझन हे औषध हत्ती रोगासाठी वापरतात.

शरिरांचा तुकडा घेऊन तपासणे म्हणजे बायोप्सी.

डायलिसीस हा उपचार मूत्रपिंडाच्या विकारासाठी वापरतात.

लसी ठेवण्यासाठीचे तापमान 2°C ते 8°C इतके असते.

गर्भधारणेपासून 28 आठवडे (7 महिने) कालावधी झालेले मृत्यू म्हणजे उपजत मृत्यू / मृतजन्म.

15 ते 45 वयोगटातील जोडपी जननक्षम जोडपी.

प्रसुतीनंतर 42 दिवसांच्या आत झालेला आईचा मृत्यू म्हणजे माता मृत्यु.

0 ते 28 दिवस यात झालेला अर्भक मृत्यू म्हणजे नवजात अर्भक मृत्यू.

सुरक्षित गर्भपाताचा जास्तीत जास्त कालावधी हा 24 आठवडे.

5 वर्षांच्या आतील मृत्यू म्हणजे बालमृत्यू होय.

जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आतील मृत्यू म्हणजे अर्भक मृत्यू होय.

नवमातांच्या आरोग्याची तपासणी करणारे सेव्हमॉम तंत्रज्ञान रोशी मुरुगेसन व धिनेश पांडियन यांनी शोधले.

टी.टी.1 लस गरोदरपणाच्या सुरुवातीला दंडात देतात.

टी.टी.2 लस गरोदर काळात टी.टी. 1 नंतर 4 आठवड्यांनी दंडात देतात.

बी. सी. जी. लस जन्मल्यानंतर लगेचच अर्भकास डाव्या दंडावर देतात.

हिपेटायटिस बी ची लस अर्भकास जन्मल्यानंतर 24 तासांच्या आत डाव्या मांडीवर देतात.

ओ. पी. व्ही. झिरो डोस जन्मल्यानंतर अर्भकास 14 दिवसांच्या आत तोंडाद्वारे देतात.

ओ.पी.व्ही. 1,2, 3 जन्मानंतर अनुक्रमे 6 वा, 10 वा व 14 वा आठवडा पूर्ण झाल्यावर तोंडाद्वारे देतात.

डि.पी.टी. 1,2, 3 जन्मानंतर अनुक्रमे 6 वा, 10 वा व 14 वा आठवडा पूर्ण झाल्यावर उजव्या मांडीच्या मध्यभागी देतात.

गोवर लस जन्मानंतर 9 महिने पुर्ण झाल्यावर उजव्या दंडात देता जीवनसत्व पहिला डोस 9 महिने पुर्ण झाल्यावर तोंडाद्वारे देतात.

डि.पी.टी. बूस्टर 1 लस 16 ते 24 महिने वयात उजव्या मांडी: देतात.

ओ.पी.व्ही. बुस्टर जन्मानंतर 16 ते 24 महिने वयात तोंडाद्वारे देतात.

गोवर बुस्टर 16 ते 24 महिने वयात उजव्या दंडात देतात.

जॅपनीज एन्स्फॅिलिटीस लस 16 ते 24 महिने वयात डाव्या दंड देतात.

अ जीवनसत्व दुसरा डोस सहा महिन्याला 5 वर्षेपर्यंत तोंडाद्वारे देतात.

डि.पी.टी. बूस्टर-2 लस 5 ते 6 वर्षे दरम्यान दंडात देतात.

टी.टी. लस 10 ते 16 वर्षे या दरम्यान दंडात देतात.

आंतरराष्ट्रीय बाल निधी (युनीसेफ), स्था. 1946, न्यूयॉर्क (अमेरिका) बालविकासासाठी कार्य करते.

अन्न व कृषी संघटना, 1945, रोम (इटली), अन्न व कृषी बाबत कार्य करते.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, 1919, जिनीव्हा(स्विझरलँड) – कामगारांच्या कल्याणासाठी कार्य करते.

जागतिक आरोग्य संघटना, 1948, जिनीव्हा (स्विझरलँड), आरोग्यसंवर्धनाचे कार्य करते.

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को) 1946, पॅरिस (फ्रान्स), शैक्षणिक विकासासाठी कार्य करते.

Leave a Comment