Contents
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 – डॉ. सय्यद अन्वर खुर्शीद यांना दिला गेला.
सौदी अरेबियातील प्रतिष्ठित भारतीय चिकित्सक, यांनी भारत-सौदी अरेबिया संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
तैफमधील किंग फैसल हॉस्पिटलमध्ये तीन दशके आणि रियाधमधील नॅशनल गार्ड हॉस्पिटलमध्ये सुमारे एक दशक रॉयल प्रोटोकॉल फिजिशियन म्हणून त्यांनी सेवा दिली.
डॉ. खुर्शीद यांनी तैफमध्ये इंटरनॅशनल इंडियन स्कूलची स्थापना केली
डॉ. खुर्शीद रियाधमधील भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली सौदी–इंडियन हेल्थकेअर फोरमचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 27 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2003 पासून प्रवासी भारतीय दिवसाला सुरवात.
9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेतुन भारतात आले होते. त्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
18 वा प्रवासी भारतीय दिवस 2025-
आयोजन ठिकाण – भुवनेश्वर,ओडीसा.
आयोजन दिनांक – 8 ते 15 जानेवारी 2025.
हा भारत सरकारचा परदेशी भारतीयांसाठीचा सर्वोच्च सन्मान आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 –
भारताची रॅकिंग – 85.
2024 मध्ये भारत 80 व्या स्थानावर.
5 अंकांनी भारताची घसरण.
2006 मध्ये भारताची रँक सर्वात जास्त – 71 .
2021 मध्ये भारताची रँक सर्वात कमी – 90 .
पाहिले 3 देश –
1st सिंगापूर – 195 देशात व्हिसामुक्त प्रवेश.
2nd जपान – 193 देशात व्हिसामुक्त प्रवेश.
3rd फिनलँड – 192 देशात व्हिसामुक्त प्रवेश.
85th भारत – 57 देशात व्हिसा मुक्त प्रवेश.
105th अफगाणिस्तान – 27 देशात व्हिसा मुक्त प्रवेश (सर्वात शेवटी)
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे- इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो–
2025 – प्रबोवो सुबियांतो(इंडोनेशिया राष्ट्रपती)
2024 – इमॅन्युएल मॅक्रॉन(फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष )
2023 – अब्देल फताह एल-सिसी(इजिप्त राष्ट्राध्यक्ष )
2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे नव्हते (कोरोना मुळे).
“राफेल चक्रीवादळामुळे” उध्वस्त झालेल्या क्युबाला भारताची मदत-
यामध्ये भारताने मदत आणि औषधे देखील पाठवली आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये हे वादळ आले होते. 8 लाख लोकांना या वादळाचा फटका बसला होता. यापूर्वी 2 जुन 2024 ला भारताने 90 टन औषध उत्पादन कच्चा माल पाठवला होता.
नुकतीच झालेली ही चक्रीवादळे-
दर्राघ – युके आणि आयर्लंड,
चिडो – फ्रान्स – मोझांबिक,
फेंगल – बंगाल उपसगरात,
बॉम्ब – वॉशिंग्टन (अमेरिका),
यागी – व्हिएतनाम (जपानने नाव),
शानशान – जपान,
असना – गुजरात (पाकिस्तान ने नाव),
एम्फिल : जपान,
अल्वोरा : मादागास्कर,
रेमल – बंगाल ची खाडी (ओमान देशाने नाव ठेवले),
हेलेन : अमेरिका,
दाना – पश्चिम बंगाल (नाव कतार देशाने दिले),
बीपरजॉय – गुजरात (बांगलादेश ने नाव दिलं आहे).
जागतिक तांदुळ उत्पादन क्रमांक –
1st – चीन.
2nd – भारत.
3rd – बांगलादेश.
तामिळनाडू राज्याने डॉल्फिन प्रकल्प सुरु केला आहे.
उत्तरप्रदेश राज्याने डॉल्फिनला जलचर प्राण्याचा दर्जा दिला आहे.
गुजरात राज्याने घोळ माशाला राज्यमासा म्हणून दर्जा दिला आहे.
महाराष्ट्र राज्याने सिल्व्हर पापलेट या माश्याला राज्यमासा म्हणून दर्जा दिला आहे.
जम्मू काश्मीर राज्याने ब्लू पॅन्झी या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून स्वीकारले आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 – परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे –
लोकसभेत सादर – 23 डिसेंबर 2004.
राष्ट्रपती सही – 15 जून 2005 (अंशतः कायदा लागू).
देशभरात लागू – 12 ऑक्टोबर 2005 (जम्मु काश्मीर वगळून) (पुर्णतः कायदा लागू).
माहिती स्वतंत्र्याचा कायदा 2000 याच्या जागी RTI विधेयक आले.
हा कायदा यायच्या आगोदरच हा कायदा महाराष्ट्रात होता.
महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा 2002.
हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र 7 वे राज्य होते.
तमिळनाडू ने पहिल्यांदा म्हणजे 1997 ला हा कायदा लागू केला होता.
महाराष्ट्राने कायदा बनवताना राज्यस्थानचा कायदा पाहून प्रेरणा घेतली.
2005 साली झालेला हा 22 वा कायदा आहे. यात 6 प्रकरणे, 31 कलमे , 3 जोडपत्रे, 2 अनुसूची आहेत.
माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार नाही तर कायदेशीर/वैधानिक अधिकार आहे.
जगात सर्वात पहिले स्वीडन मध्ये हा कायदा लागू.
कलम 3 मध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे.
कलम 7 नुसार 30 दिवसात सर्वसाधारण माहिती मिळण्याचा कालावधी आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संबंधित आरटीआय असेल तर 48 तासात माहिती देणे बंधनकारक असते.
भारतीय संविधान कलम 19(1) अ मध्ये समाविष्ट.
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड – 25,000/-
माहिती अधिकार संबंधित सर्वोच्च न्यायालयात खटला राज नारायण विरुदध स्टेट ऑफ उ. प्र.
केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त – वजाहत हबीबुल्ला.
केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय – दिल्ली.
राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांना देतात.
माहिती अधिकार लागू करणारा भारत हा जगातील 56 वा देश.
महाराष्ट्र – माहिती अधिकार ऑनलाईन करणारे पहिले राज्य.
RTI अंतर्गत आपण 20 वर्षामगील माहिती मागवू शकतो.
पार्थ योजना – मध्यप्रदेश सरकार.
PARTH – Police Army Recruitment Training & Hunar.
या योजनेंतर्गत सरकार राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देणार आहे.
शारीरिक ते परीक्षेपर्यंतची तयारी केली जाणार आहे.
त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यासाठी प्रशिक्षणार्थीकडून दर महिन्याला ठराविक शुल्क आकारण्यात येणार आहे.
काही राज्यांनी सुरू केलेल्या योजना-
शहिद माधो सिंग हाथ खर्च योजना – ओडीसा (अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांमधील गळतीचे प्रमाण कमी करणे).
हर घर लखपती योजना – SBI बँक.
रायथू भरोसा योजना – तेलंगणा (शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य).
जलवाहक योजना – भारत सरकार (ही योजना जलमार्गांवर 300 किलोमीटर पेक्षा जास्त मालाची वाहतूक करण्यासाठी थेट प्रोत्साहना साठी).
स्माइल उप-योजना – ही एक केंद्र सरकारची पुनर्वसन योजना आहे.
दिपम 2.0 योजना – आंध्रप्रदेश (महिलांना मोफत गॅस देणे).
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक नवी दिल्ली येथे होणार आहे.
हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था‘ (HIPA) चे नाव बदलून त्याला डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव दिले गेले.
संयुक्त राष्ट्र च्या रिपोर्ट नुसार 2025 मध्ये भारताचा विकासदर 6.6% असणार आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने भूतानमध्ये 6×170 मेगावॅट पुनतसांगछू-II जलविद्युत प्रकल्पाचे दोन युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केले.
आणीबाणीच्या काळात तुरुंगावास भोगलेल्या लोकांना ओडीसा सरकारने महिना 20 हजार पेन्शन सुरू केली आहे.
भारताने थर्ड जनरेशन की स्वदेशी एंटी टैंक गाइड मिसाइल ‘नाग‘ चे यशस्वी परीक्षण केले.
देशातील पहिली चालकविरहित ट्रेन – बेंगळुरू मेट्रो.
ट्रेन बंगाल-आधारित टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड (TRSL) ने बनवली आहे.
ही ट्रेन मेड इन इंडिया – संपूर्णपणे भारतात उत्पादित केलेली ही पहिली मेट्रो ट्रेन आहे.
येलो लाईनवर धावणार आहे.
ही ट्रेन इलेक्ट्रॉनिक्स सिटीला उर्वरित बेंगळुरूशी जोडेल.
18 किलोमीटर चा प्रवास ही ट्रेन करणार आहे.
टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेडची पहिली स्टेनलेस स्टील ट्रेनसेट आहे.
काही नुकतेच झालेल्या भारतातील पहिल्या घटना–
इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून(IGBC) प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय – दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान (बनखंडी- हिमाचल).
भारतातील पहिले वाहतूक अभियांत्रिकी केंद्र आणि संस्थात्मक विकास केंद्र – गुरूग्राम (हरियाणा).
भारतातील पहिले सांकेतिक भाषेतील DTH चॅनल – चॅनेल 31.
भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल – अंजी खड्डा ब्रिज (रियास जिल्हा -अंजी नदीवर – जम्मु काश्मिर).
आशियातील/भारतातील पहिली जलवाहतूक सेवा – उबेर शिकारा (दाल सरोवर -काश्मीर).
भारतातील पहिल्या ‘Gen Beta बाळाचा जन्म – नाव फ्रँकी.
समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुल – कन्याकुमारी.
भारतातील पहिल्या बायो-बिटुमेन राष्ट्रीय महामार्ग – नागपूर.
देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वे – अहमदाबाद ते भुज.
ISRO देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन सुरू केले – लेह (लडाख येथे).
Nice current but उद्या मला याचा benefit झाला तर कळेल हे imp, आहे की नाही,
Thank you….All the best for your exam.