Contents
बुध(Mercury)-
- सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह.
- सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह.
- सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह.
- बुध ला एकही उपग्रह नाही.
- बुधावार दिवस कडक ऊन तर रात्री प्रचंड थंडी असते.
शुक्र(Venus)-
- सर्वात तेजस्वी ग्रह.
- पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह.
- एकही उपग्रह नाही.
- सूर्योदया पूर्वी पूर्वेकडे दिसतो म्हणून त्याला मॉर्निंग स्टार/पहाटेचा तारा म्हणतात तर सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसतो म्हणून इव्हनिंग स्टार / संध्याकाळचा तारा असे म्हणतात.
- चंद्राप्रमाणे शुक्राच्या देखील कला दिसतात.
- सरासरी घनता : 5.24 ग्रॅ./सें. मी³.
- तापमान : 462° सें.
- शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे.
- परिवलन काळ : 224 दिवस.
- परिभ्रमण काळ : 225 दिवस
- शुक्राची कक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे.
पृथ्वी(Earth)-
- पृथ्वी हा एक ग्रह आहे.
- पृथ्वीवर 29% भूभाग तर 71% पाणी आहे.
- क्षेत्रफळ 510 द.ल.चौ.कि.मी. आहे.
- पृथ्वीला जलग्रह असेही म्हणतात.
- चंद्र हा एकच उपग्रह आहे.
- सजीवसृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे.
- आकार (जिऑईड) प्रकारचा आहे.
- उत्पत्ती : 4 अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी.
- पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजेच परिवलन.
- पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजेच परिभ्रमण.
- पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान : 14.9° सें.
- पृथ्वीवरील किमान तापमान: – 89° सें (अंटार्क्टिका)
- पृथ्वीवरील कमाल तापमान : 57.7° सें. (अल अजिया, लिबीया)
- पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 24 तास लागतात.
- पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास सुमारे 365.25 दिवस लागतात.
- पृथ्वी या संस्कृत शब्दाचा अर्थ एक विशाल धरा असा होतो.
- पृथ्वीचा सरासरी परिघ : 40,041.47 किमी.
- पृथ्वीचा सरासरी व्यास : 12,742 कि. मी.
- पृथ्वीचे वस्तुमान : 5.9736×1024 किलोग्रॅम.
- पृथ्वीवरील सर्वाधिक उंची : माऊंट एव्हरेस्ट 8848.8 मीटर.
मंगळ(Mars)-
- पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
- लालसर तांबूस रंग.
- २ उपग्रह.
- प्राणवायू नाही.
- सजीवसृष्टी असावी, यासाठी संशोधन चालू.
- सारासरी तापमान -६५° से.
गुरू(Jupiter)-
- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
- एकूण ७९ उपग्रह आहेत.
- गुरूवर पांढरट पट्टे आहेत.
- सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह.
- तापमान: -१४२ ते -१७३° से.
- चंद्र व शुक्रानंतर सर्वाधिक प्रकाशमान ग्रह.
शनी(Saturn)-
- शोध गॅलिलिओने लावला.
- शनीभोवती कडे आढळते.
- एकूण ८२ उपग्रह.
- टायटन हा प्रमुख उपग्रह.
- आकाराने दुसरा सर्वात मोठा ग्रह.
- शनीचे वातावरण हायड्रोजन व हेलियमचे बनले आहे.
प्रजापती(Urenus)-
- एकूण २७ उपग्रह.
- शोध – विलियम हर्षल.
- सूर्यमालेतील ७ वा ग्रह.
- पृथ्वी पेक्षा ६३ पट मोठा.
- परिभ्रमण काळ ८४ वर्ष.
- तापमान – ३५३°से.
वरुण(Neptune)-
- शोध – जॉन गेल.
- उपग्रह १४.
- तापमान -२१४°से.
- परिभ्रमण काळ १६५ वर्ष.
- फक्त दूर्बिनिनेच पाहता येते.
- या ग्रहाचे वातावरण मिथेन या विषारी वायूने बनलेले आहे.
प्लुटो –
- हा आता ग्रह नाही.
- २००६ पासून याला बटूग्रह म्हणतात.
सूर्य(Sun)-
- सूर्य हा तारा आहे.
- याची निर्मिती सुमारे ४६० कोटी वर्षापूर्वी झाली आहे.
- सूर्याचे पृथ्वीपासून अंतर १४,९४,५०,००० कि.मी. आहे
- सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास सुमारे ८ मि. २० से. लागतात.
- सूर्याच्या पृष्भागावरील तापमान ६०००° से.
- सूर्यावर केंद्रीय सम्मेलन ( Nuclear Fussion ) होऊन ऊर्जा निर्मिती होते.
- सूर्यावर हायड्रोजन वायू सर्वात जास्त आहे.
चंद्र(Moon)-
- चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे.
- पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 3,84,365 कि.मी. आहे.
- चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनीटे उशिरा उगवतो.
- चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे, उंचवटे व घळ्या आहेत.
- पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सुर्य यांमध्ये पृथ्वी असते.
- अमावस्येच्या दिवशी पृथ्वी व सुर्य यांमध्ये चंद्र असतो.
- चंद्राचा परिवलन व परिभ्रमण काळ हा सारखाच असतो.सुमारे 27.3 दिवस इतका असतो.
- पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाच्या कालखंडास वदयपक्ष (कृष्णपक्ष) म्हणतात.
- अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या कालखंडास शुध्दपक्ष (शुक्लपक्ष) म्हणतात.
- अमावस्या ते अमावस्या हा काळ म्हणजे एक चांद्रमास होय.
- चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 5°8′ मापाचा कोन करते.
- प्रत्येक पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात.
- चंद्र उगवताना व मावळताना नेहमीच्या आकारपेक्षा मोठा दिसतो.
- चंद्र परप्रकाशित आहे.
- चंद्रावर वातावरण नाही. कारण त्याचे गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे.
- चंद्राला सुर्यापासून प्रकाश मिळतो.
- चंद्राचा केवळ 59% पृष्ठभाग (एकच बाजू) पृथ्वीवरून नेहमी दिसतो. म्हणजे त्याचा 41% भाग कधीच दिसत नाही.
- चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आल्यास त्यास सुपर मून म्हणतात.
- एका महिन्यात दोनदा पौर्णिमा आल्यास दुसरी पौर्णिमा ब्ल्यू मून असते.
- चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र काळसर व तांबूस दिसतो यास ब्लड मून म्हणतात.
ग्रहण(Eclipse)-
- खंडग्रास चंद्रग्रहण – पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमूळे चंद्राचा काही भाग झाकतो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
- खग्रास चंद्रग्रहण – पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकतो, त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
- चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते.
- सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येला घडते.
- अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.
- सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात.
- सूर्यग्रहण-चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो, यालाच सूर्यग्रहण म्हणतात. कालावधी जास्तीत जास्त 107 मिनीटे असतो.
- खंडग्रास सुर्यग्रहण – चंद्राच्या पृथ्वीवरील उपच्छायेमुळे सुर्याचा काही भागच झाकला जातो, यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
- खग्रास सूर्यग्रहण – चंद्राच्या पृथ्वीवरील प्रच्छायेने संपूर्ण सुर्य झाकला जातो, यालाच खग्रास सुर्यग्रहण म्हणतात. कालावधी जास्तीत जास्त 7 मिनीटे 20 सेकंद.
- कंकणाकृती सुर्यग्रहण – चंद्राच्या अपभू स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. चंद्राच्या प्रच्छायेमुळे सूर्याचा मधलाच भाग झाकतो, यालाच कंकणाकृती सुर्यग्रहण म्हणतात.
भरती-ओहोटी :
- सागरी पाण्याच्या पातळीतील नियमित होणाऱ्या चढ उताराला भरती-ओहोटी म्हणतात.
- एका दिवसातून साधारणत: दोन वेळा भरती आहोटी येते.
- दोन भरतीतील अंतर हे सुमारे 12 तास 25 मिनीटे असते.
- उधाणाची भरती ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व मोठी असते.
- भांगाची भरती अष्टमीच्या दिवशी येते. या दिवशी चंद्र-सुर्य एकमेंकाशी काटकोनात असतात. चंद्र व सूर्य यांच्या आकर्षण शक्तीत संतुलन स्थापित होऊन भांगाची भरती येते. ही भरती लहान असते.
- भरती-ओहोटी यांची निर्मिती पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते.
- खुल्या समुद्रात भरतीचे अंतर कमी तर उथळ समुद्रात भरतीचे अंतर जास्त असते.
- सागर किनाऱ्याचा प्रभाव भरतीच्या उंचीवर पडतो.
- भरती-ओहोटीची वेळ प्रत्येक स्थानी वेग-वेगळी असते.
- सूर्याची भरती उत्पादन शक्ती चंद्राच्या तुलनेत कमी आहे. कारण त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर चंद्रापेक्षा खूप जास्त आहे.
- परिणाम :
- भरतीमुळे समुद्रातील सजीव जमिनीवर येतात.
- समुद्रकिनारी खाजने तयार होतात.
- खाड्यांची निर्मिती होते.
- नदीमुखाजवळ गाळ साचतो.नदीपात्रात खारे पाणी येते.
- भरतीमुळे तयार झालेल्या खाजणाचा मासेमारी व मीठउद्योग यासाठी वापर होतो.
- समुद्राजवळील नदीपात्र खुले राहते याचा उपयोग जलवाहतुकीसाठी होतो.
- भरतीकाळात उपसागर व खाड्या येथे मासेमारी चालते.
- भरती-ओहोटीच्या वेळेनुसार जहाजांची हालचाल/प्रवास ठरविता येतो.
- नदीपात्रात भरतीमुळे खारे पाणी येते.
- खारे व गोडे पाणी एकत्र होते यास मचूळ (नीमखारे) पाणी म्हणतात. या पाण्यात काही विशेष प्रकारचे मासे वाढतात.
- मोठी भरती आल्यास किनाऱ्यावर हानीची शक्यता असते.